नुकतीच अजित पवार यांनी शरद पवारांची दिल्लीतील सहा जनपथ या निवासस्थानी जाऊन भेट घेतली होती या भेटीनंतर काका पुतण्यांमध्ये मनोमिलन होत आहे की काय अशा चर्चांना उधाण आल्या असतानाच आज रोहित पवार यांच्या मातोश्री सुनंदा राजेंद्र पवार यांनी केलेल्या एका विधानामुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात पुन्हा नव्या चर्चांना उधाण असून भविष्यात पवार कुटुंब एकत्र येणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या.
अजित पवार गट आणि शरद पवार गट एकत्र येतील याबाबत काही सांगता येणार नाही. सगळ्याच कुटुंबांमध्ये मतभेद असतातच. मतभेद मिटतील. भविष्यात हे एकत्र येऊ शकतात. त्यांनी एकत्र यायला पाहिजे असे मला वाटते, असेही सुनंदा पवार म्हणाल्या. “मूठ घट्ट असेल, तर त्याची ताकद राहते. आपण विखुरलेले राहू तर ती ताकद कमी होते. पण कुणी कुणासोबत जायला हवे हा निर्णय त्या दोघांनी घ्यायला हवा, असेही त्या म्हणाल्या.
कुटुंबात मतभेद असतात भविष्यात नक्की मिटतील
कसंही वागले तरीही टीका होत असते. अजित पवार कुठेही गेले तरीही बातम्या होत असतात. ‘दोन्ही गट पुन्हा एकत्र येऊ शकतील का? या प्रश्नावर बोलताना पवार म्हणाल्या, यावर काही सांगता येणार नाही. कुटुंबात मतभेद असतातच,असं मोठं विधान आमदार रोहित पवार यांच्या आई सुनंदा पवार यांनी केले आहे.