राज्यात नुकताच झालेल्या विधानसभा निवडणुकी महायुती 230 जागा मिळवत स्पष्ट बहुमतात सत्तेत आली अनेक दिग्गजांना पराभवाचा फटका बसला असतानाच भाजपाचे कालिदास कोळंबकर हे सलग नऊ वेळा निवडून आले
आधी शिवसेना व काँग्रेस आणि आता भाजपा असा कालिदास कोळंबकर यांचा राजकीय प्रवास आहे. 1990 पासून कालिदास कोळंबकर हे आमदार म्हणून विजयी होत असून 1990, 1995, 1999, 2004 पर्यंत ते शिवसेनेकडून मुंबईतील नायगाव या मतदारसंघातून विजयी झाले होते पुढे नारायण राणे यांनी शिवसेना सोडल्यानंतर कालिदास कोळंबकर यांनी शिवसेना सोडत काँग्रेसमध्ये प्रवेश केला त्यानंतर झालेल्या पोटनिवडणुकीतही कालिदास कोळंबकर विजयी झाले.
पुढे मतदारसंघांची पुनर्रचना झाल्यानंतर 2009 मध्ये वडाळा मतदार संघ अस्तित्वात आला त्यानंतर काँग्रेसकडून कालिदास कोळंबकर वडाळा मतदार संघातून विजयी झाले 2014 ला मोदी लाटेतही कालिदास कोळंबकर हे वडाळा मतदार संघातून विजयी झाले होते त्यानंतर 2019 मध्ये कालिदास कोळंबकर यांनी भाजपा प्रवेश करत वडाळा मतदारसंघातून विजयी झाले होते. 2019 मध्ये हंगामी विधानसभा अध्यक्ष म्हणूनही कालिदास कोळंबकर यांनी काम पाहिलं. त्यानंतर आता पुन्हा 2024 ला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उमेदवारांनी मुंबईच्या माजी महापौर श्रद्धा जाधव यांचा 24 हजार 973 मतांनी पराभव करत कालिदास कोळंबकर हे विधानसभेत पोहोचले आहेत.