मतदान संपलं, एक्झिट पोल आले; राज्यात कुणाच सरकार?; राज्यातील प्रमुख संस्थांचे एक्झिट पोल काय सांगतात

283 0

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीसठी मतदान पार पडला असून पाच वाजेपर्यंत 58.28% इतकं मतदान पार पडला आहे.

मतदान पार पडल्यानंतर लगेचच एक्झिट पोल समोर आले असून या एक्झिट पोलमध्ये महायुती आणि महाविकास आघाडी मध्ये काटे की टक्कर पाहायला मिळत आहे

कोणत्या संस्थांच्या एक्झिट पोलचा काय अंदाज?

मॅट्रिक्सने केलेल्या एक्झिट पोलनुसार भाजपाला 89 ते 101 शिंदेंच्या शिवसेनेला 37 ते 45 तर अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला 17 ते 26 जागा मिळण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. तर काँग्रेस पक्षाला 39 ते 47 राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला 35 ते 43 तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला 21 ते 39 जागा मिळण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. यासोबतच इतरांना आठ ते दहा जागा मिळतील असा अंदाज व्यक्त केला आहे.

चाणक्य स्ट्रॅटेजीस या संस्थेने केलेल्या एक्झिट पोल नसार भाजपाला नव्वद हुन अधिक जागा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला 80 हून अधिक जागा तर अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला 22 किंवा त्याहून अधिक जागा मिळतील असा अंदाज व्यक्त केला आहे. काँग्रेस पक्षाला 63 आणि त्याहून अधिक राष्ट्रवादी शरचंद्र पवार पक्षाला 40 तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला अधिक जागा मिळण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे तर इतरांना सहा ते आठ जागा मिळतील असं सांगितलं गेलंय

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!