महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी अवघे काही दिवस उरले असून, राज्यात प्रचाराचा जोर चांगलाच वाढला आहे. अशातचमुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या ‘बंटोगे तो कटोगे’ या विधानावरून राजकीय वातावरण तापलं आहे. या घोषणेबद्दल बॉलिवूडअभिनेत्री आणि भाजप खासदार कंगना रणौत यांनी दिलेलं विधान चर्चेत आलं आहे.
काय म्हणाली कंगना
कंगना रणौत यांनी सुरुवातीला माध्यमांशी बोलताना सांगितलं की, ‘बंटोगे तो कटोगे’किंवा ‘वोट जिहाद’ हे मुद्दे विरोधकांनीउपस्थित केले आहेत, आमच्या पक्षाने नाही. भाजप आपल्या कामाच्या जोरावर जिंकत आहे. विरोधक जाती–धर्माच्या नावाखालीफूट पाडण्याचा प्रयत्न करत आहेत, मात्र हे लोक आता स्वतःचीच कबर खोदत आहेत. लोकांना आता या गोष्टींकडे लक्ष द्यायचंहीनाही,” असं कंगना म्हणाल्या. कंगना पुढे म्हणाली, “आमचा पक्ष सनातनी आहे, जो सर्वांना एकत्र ठेवण्याचं काम करतो. आम्हालादेश एकसंध ठेवायचा आहे. जर आमच्या पक्षाने ठरवलं, तर आम्ही पाकव्याप्त काश्मीरलाही देशाचा भाग करू शकतो. मात्र, विरोधकांची फूट पाडण्याची खेळी आता फसली आहे.”
‘बंटोगे तो कटोगे’ही एकतेची हाक
योगी आदित्यनाथ यांच्या घोषणेबद्दल विचारले असता, कंगना म्हणाली,‘ही घोषणा एकतेची हाक आहे. एकता हीच आपली ताकदआहे, असं आपण लहानपणापासून वाचत आलो आहोत. जोपर्यंत आपण एकत्र राहतो, तोपर्यंत आपण सुरक्षित असतो. पण जेव्हाआपण विभागले जाऊ, तेव्हा आपण असुरक्षित होतो. हे कुटुंबाप्रमाणे आहे. कुटुंब एकत्र असावं, तसं देशानेही एकत्र राहायला हवं.’
कंगनाने केलेल्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरु झाली आहे. कंगनाने ‘बंटोगे तो कटोगे’या घोषणेचं समर्थन करतविरोधकांवर थेट निशाणा साधला आहे. तिचं हे परखड मत भाजपच्या प्रचाराला कशी चालना देतं, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.