टीम इंडिया आणि साऊथ आफ्रिकेमधील चार सामन्यांची टी-20 मालिकेतला शेवटचा सामना आज होणार आहे. या मालिकेत भारत 2-1 अश्या आघाडीवर आहे. आता या मालिकेदरम्यान भारतीय संघाचा यष्टिरक्षक फलंदाज संजू सॅमसनच्या वडिलांनी काही खेळाडूंवर गंभीर आरोप केले आहेत.
या खेळाडूंवर केले संजूच्या वडिलांनी आरोप
संजू सॅमसनचे वडील विश्वनाथ सॅमसन यांनी विराट कोहली, रोहित शर्मा, महेंद्रसिंग धोनी, आणि राहुल द्रविड यांच्यावर निशाणा साधत असा आरोप केला आहे की, या चार खेळाडूंमुळे संजूचं करियरला 10 वर्ष खराब झाल.
त्यांनी माजी खेळाडू श्रीकांत याचं ही नाव घेतलं.
त्यांच्या म्हणण्यानुसार, या खेळाडूंनी संजूच्या कामगिरीकडे दुर्लक्ष केलं, ज्यामुळे त्याला खूप संघर्ष करावा लागला.
काय म्हणाले संजूचे वडील
विश्वनाथ सॅमसन यांनी सांगितलं की, “संजूने बांगलादेशविरुद्ध शतक ठोकलं होतं, पण त्याबाबत कोणीही काही बोललं नाही. त्याला चांगल्या कामगिरीसाठी कधीच योग्य ते श्रेय मिळालं नाही.”
संजूच्या कौशल्याची योग्य दखल घेतली गेली नाही,असं मत त्यानी व्यक्त केलं.
यावर्षीच्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये संजू सॅमसनला संघात स्थान मिळालं होतं, परंतु प्लेइंग 11 मध्ये त्याला स्थान मिळाल नाही. वर्ल्ड कपनंतर झालेल्या टी-20 मालिकेत संजूने दोन शतके झळकावत इतिहास घडवला, पण एक सामन्यात शून्यावर बाद झाल्याने त्याला ट्रोल केलं गेलं.
विश्वनाथ सॅमसन यांनी केलेल्या या गंभीर आरोपांमुळे क्रिकेट विश्वात खळबळ उडाली आहे. आता या आरोपांवर संघ व्यवस्थापन आणि खेळाडू काय प्रतिक्रिया देतात, हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.