नुकत्याच पार पडलॆल्या महाराष्ट्र विधानसभा (MAHARASHTRA VIDHANSABHA) निवडणुकीत 132 जागा जिंकत भाजप (BJP)महाराष्ट्रातील सर्वात मोठा पक्ष ठरला. राज्यात देवेंद्र फडणवीस (DEVENDRA FADNVIS) राज्याचे मुख्यमंत्री बनले मात्र महाराष्ट्र आणि हरयाणामध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपला यश कसं मिळालं यासंदर्भातब नुकताच एक सर्व्हे प्रसिद्ध झाला आहे.

भाजपानं मित्र पक्षांसाठी सोडल्या ‘या’ चार जागा

122 0

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांची घोषणा झाली असून आतापर्यंत भारतीय जनता पक्षांना 146 उमेदवार जाहीर केले असून आता भाजपाने चार जागांवर मित्र पक्षांना मदत करण्याचं ठरवलं असून मित्र पक्षांसाठी चार जागा सोडल्या आहेत.

यामध्ये रवी राणा यांच्या स्वाभिमान पक्षासाठी बडनेरा विधानसभेची जागा सोडण्यात आली असून या जागेवरून स्वतः रवी राणा हे निवडणूक लढणार आहेत. गंगाखेडची जागा महादेव जानकर यांच्या राष्ट्रीय समाज पक्षाला सोडण्यात आली असून या जागेवर या आधीच राष्ट्रीय समाज पक्षांना रत्नाकर गुट्टे यांना उमेदवारी दिली असून आपण महायुतीतून बाहेर पडत असल्याचे जाहीर केलं होतं.

तर कलिना मतदार संघाची जागा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाला सोडण्यात आले आहेआहेतशाहूवाडी विधानसभेची जागा जनस्वराज्य पक्षाच्या विनय कोरे यांना सोडण्यात आले असून स्वतः विनायक कोरे हेच या मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!