उद्योगसूर्याचा अस्त! उद्योगपती रतन टाटा यांचं निधन; पाहा कसा होता प्रेरणादायी प्रवास

840 0

भारतातील प्रसिद्ध उद्योगपती आणि टाटा सन्सचे माजी अध्यक्ष रतन टाटा यांच मुंबईतील ब्रिज कँडी रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झालं. त्यांच्या निधनाने उद्योग जगतात मोठी शोककळा पसरली.

86 वर्षीय रतन टाटा यांना 06 ऑक्टोबर रोजी मध्यरात्रीच्या सुमारास अस्वस्थ वाटू लागले होते. रक्तदाब कमी झाल्याने आणि श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्याने रतन टाटा यांना तत्काळ ब्रीच कॅंडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तसेच त्यांच्यावर आयसीयूत उपचार सुरू होते. बुधवारी उपचारा दरम्यान त्यांची प्रकृती घालवल्याने त्यांना व्हेंटिलेटर वर ठेवण्यात आलं. रुग्णालयातील डॉक्टरांकडून त्यांच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी यासाठी सर्व शर्तीचे प्रयत्न सुरू होते मात्र रात्री उशिरा त्यांचं दीर्घ आजारानं निधन झालं. त्यांच्या या निधनाने संपूर्ण उद्योग क्षेत्रासह, भारतीयांमध्ये शोककळा पसरली आहे. त्यांच्या निधनावर पंतप्रधान नरेंद्र मोदी गृहमंत्री अमित शहा, विरोधी पक्ष नेते राहुल गांधी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, मनसे अध्यक्ष राजे ठाकरे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी दुःख व्यक्त केले. राज्य सरकारकडून रतन टाटा यांच्या निधनावर एक दिवसाचा शासकीय दुखवटा जाहीर करण्यात आला. सकाळी १० वाजल्यापासून दुपारी ३.३० पर्यंत त्यांचे पार्थिव नरीमन पॉईंट येथील एनसीपीएमध्ये अंत्यदर्शनासाठी ठेवले जाणार आहे. त्यानंतर दुपारी ३.३० वाजता टाटा यांचे पार्थिव अंत्यसंस्कारासाठी वरळीच्या दिशेने रवाना होईल. यानंतर संध्याकाळी ४ वाजता मरीन ड्राईव्ह मार्गे पेडर रोडवरुन ही अंत्ययात्रा वरळीतील स्मशानभूमीत दाखल होईल आणि ४.३० नंतर टाटांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात पारसी पद्धतीने अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.

संपूर्ण जगासमोर गुणवत्ता आणि सचोटीच्या आदर्श निर्माण करणारे कोट्यावधी मनावर आपल्या प्रेरणादायी आचार आणि विचारांचा वस्तुपाठ कोरणारे प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांचं निधन झालं.

रतन टाटा यांचा जीवन प्रवास कसा होता?

रतन टाटा यांचा 28 डिसेंबर 1937 रोजी मुंबईत जन्म झाला

1955 मध्ये त्यांनी न्यूयॉर्क सिटीतील रिव्हरडेल कंट्री स्कूलमधून पदवीचं शिक्षण पूर्ण केलं

1959 मध्ये त्यांनी कॉर्नेल विद्यापीठातून आर्किटेक्चरची पदवी संपादित केली

1962 मध्ये त्यांनी वयाच्या 24 व्या वर्षी टाटा ग्रुपमधून करिअर सुरू केलं

1971 मध्ये त्यांनी टाटा समूहातील ‘नेल्को’ या कंपनीची धुरा सांभाळली

1975 मध्ये हार्वर्ड बिझनेस स्कूलमधून मॅनेजमेंटचा कोर्स पूर्ण केला

1977 एम्प्रेस मिल’ या टाटा समूहातील’मिलची जबाबदारी सांभाळली

1981 मध्ये त्यांनी टाटा इंडस्टीज’ची सूत्रे हाती घेतली

1991 मध्ये जेआरडी टाटांनंतर ‘टाटा समूहाचे’ पाचवे अध्यक्ष’ म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली

1998 मध्ये भारतातील पहिले स्वदेशी वाहन टाटा इंडिकाची निर्मिती करण्यात आली

2000 मध्ये ‘टेंटली’ला विकत घेत जगातील सर्वात मोठी ‘टी बॅग्ज’ बनवणारी कंपनी निर्माण केली

 2000 मध्ये भारत सरकारने त्यांना पद्मभूषण पुरस्कारानं सन्मानित केलं

2001 मध्ये त्यांना ओहिओ स्टेट विद्यापीठाकडून व्यवसाय प्रशासनाची मानद डॉक्टर पदवी सुपूर्त करण्यात आली

2004 मध्ये साऊथ कोरिया मधील Daewoo Commercial Vehicle कंपनीचे मालकी हक्क विकत घेतले

2004 मध्ये त्यांनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) सार्वजनिक करण्याचा निर्णय घेतला

2006 मध्ये त्यांचा उद्योग तसेच सामाजिक घटकांमधील योगदानाबद्दल महाराष्ट्र भूषण पुरस्काराने गौरव करण्यात आला

2007 मध्ये वयाच्या 69 व्या वर्षी F-16 फाल्कन प्लेन उडवणारे पहिले भारतीय बनले

2007 मध्ये त्यांनी Corus Group विकत घेत तिचं Tata Steel Europe असे नामांतरण केलं

2008 मध्ये शिक्षण व्यवस्था सुधारण्यासाठी ‘टाटा एज्युकेशन अँड डेव्हलपमेंट ट्रस्ट’ची स्थापना केली

2008 मध्ये त्यांनी फोर्ड कार समूहाकडून ‘जॅग्वार’ आणि ‘लैंड रोव्हर’ या मोठ्या कार कंपन्यांची खरेदी केली

2008 मध्ये त्यांना भारत सरकारकडून पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं 

2008 मध्ये सिंगापूर सरकारकडून मानद नागरिक पुरस्काराने त्यांचा गौरव करण्यात आला 

2009 मध्ये सर्वसामान्यांचे चारचाकी घेण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी 1 लाख किमतीत ‘नॅनो’ लॉन्च करण्याचा निर्णय घेतला 

28 डिसेंबर 2012 रोजी वयाच्या 75 व्या वर्षी टाटा समूहातून निवृत्ती घेतली

2016 मध्ये त्यांनी टाटा समूहाचे अंतरिम अध्यक्ष म्हणून पुन्हा एकदा पदभार सांभाळला

फेब्रुवारी 2017 मध्ये टाटा समूहातून पुन्हा एकदा निवृत्ती घेतली

2023 मध्ये महाराष्ट्र सरकारकडून सर्वात पहिल्या ‘उद्योगरत्न’ पुरस्काराने त्यांचा गौरव करण्यात आला

9 ऑक्टोबर 2024 मध्ये वयाच्या 86 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला 

रतन टाटा यांच्या निधनानंतर टाटा समूहाची जबाबदारी

टाटा समूहाचे संभाव्य वारस म्हणून माया टाटा, नेव्हिल टाटा आणि लिया टाटा यांच्याकडे पाहिलं जात आहे.हे तिघेही रतन टाटांचे भाऊ नोएल टाटा यांची मुले आहेत.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!