महाविकास आघाडी सरकारच्या काळात सगळेच पॅरापीटर्स बदलतायत. मग मोहित कंबोजच्या गाडीवर हल्ला करणे असेल किंवा पोलखोल यात्रेवर हल्ला करणे असेल किंवा आज जो ड्रामा असेल. असं भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील पुण्यात पत्रकारांशी बोलताना म्हणाले.
नवनित राणा, रवी राणा यांच्या घरासमोर कालपासून शिवसैनिक आहेत. पोलीस राणा दांपत्याला संरक्षण देऊ शकत नाहीत. तुम्ही जर प्रोटेक्शन देऊ शकत नसाल तर सत्ता सोडा. राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था बिघडलीय.
हनुमान चालीसा म्हणायला विरोध करण्याचा कारण नाही. ही काही राक्षस चालीसा नाही. असं देखील पाटील म्हणाले