पुणेकरांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे. पुणेकरांच्या पिण्याच्या पाण्याची चिंता मिटली असून पुण्याला पाणीपुरवठा करणारी सर्वच धरणे 50 टक्क्यांपेक्षा जास्त भरली आहेत. सर्व धरणांमध्ये पाणी पातळी वाढल्याने काही लहान मोठा धरणांमधून विसर्ग करण्यात येत आहे. यास पार्श्वभूमीवर पुणेकरांसाठी महत्त्वाची सूचना प्रसारित करण्यात आली आहे. पुण्यातील खडकवासला धरणातून आज नदीमध्ये विसर्ग करण्यात येण्याची शक्यता आहे. त्या अनुषंगाने पुणेकरांनी खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
पुण्यातील खडकवासला धरण 85% भरले आहे. पाऊस वाढत असून पाऊस पडण्याचे आणखी बरेच दिवस बाकी आहेत. त्यामुळे खडकवासला धरण ओवर फ्लो होऊ नये यासाठी खडकवासला धरणाच्या सांडव्यातून नदीपात्रामध्ये पुढील 24 ते 48 तासात पाण्याचा विसर्ग करण्याची शक्यता आहे. त्या दृष्टिकोनातून तयारी सुरू करण्यात आली आहे. पुणे महानगरपालिका व पोलीस प्रशासन यांना देखील याबाबतची दक्षता घेण्याच्या सूचना देण्यात आले आहेत. तसेच कालव्यांमध्ये आणि नदीपात्रांमध्ये नागरिकांनी उतरू नये, नदीपात्रांच्या आसपास लावलेली वाहने, जनावरे काढून सुरक्षित ठिकाणी ठेवावीत. स्वतःच्या आणि इतरांच्या जीवित अशी संपूर्ण खबरदारी घ्यावी, असे आवाहन खडकवासला पाटबंधारे विभागाकडून करण्यात आले आहे.