अतिरिक्त जिल्हाधिकारीपदाचा राजीनामा देत राष्ट्रवादीत प्रवेश ते विधानपरिषद आमदार; कसा आहे शिवाजीराव गर्जेंचा राजकीय प्रवास?

3445 0

नुकताच पार पडलेल्या महाराष्ट्र विधान परिषदेच्या निवडणुकीत अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून शिवाजीराव गर्जे विजयी झालेत… कोण आहे शिवाजीराव गर्जे आणि कसा आहे त्यांचा राजकीय प्रवास पाहूयात…

काँग्रेसची फारकत घेत 10 जून 1999 ला शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केल्यानंतर सनदी अधिकारी असणारा एक तरुण आपल्या नोकरीचा राजीनामा देत शरद राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये सामील झाला.. या तरुणाचं नाव होतं शिवाजीराव गरजे. शिवाजीराव गरजे हे मूळचे अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी गावचे पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयांमधून शिवाजीराव गर्जे यांनी एम ए पर्यंतचे क्षण पूर्ण केला. 1977 ते 1980 या कार्यकाळात शिवाजीराव गरजे यांनी प्राध्यापक म्हणून नोकरी केली. 1980 मध्ये शिवाजीराव गरजे यांनी एमपीएससी परीक्षेत यश मिळवलं आणि त्यांची तहसीलदारपदी निवड झाली. प्रशासनातील उत्तम कामगिरीमुळे शिवाजीराव गर्जे यांना अनेक पुरस्कार देखील मिळाले आहेत पुढे तब्बल दोन दशकांच्या प्रशासकीय सेवेनंतर अतिरिक्त आयुक्त पदाचा राजीनामा देत शिवाजीराव गरजे हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये सामील झाले. राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून म्हणजे 1999 पासून शिवाजीराव गरजे हे राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस म्हणून जबाबदारी पाहत होते. त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रशासनाची जबाबदारी देखील गरजे यांच्या खांद्यावर होती.. महाविकास आघाडीचा सरकार असताना राज्यपाल नियुक्त आमदारांच्या यादीमध्ये देखील शिवाजीराव गरजे यांचं नाव होतं मात्र राज्यपाल नियुक्त आमदारांच्या या यादीला मान्यता मिळाली नाही पुढे अजित पवार यांनी वेगळी भूमिका घेतल्यानंतर शिवाजीराव गरजे अजित पवारांसोबत आले आणि आता शिवाजीराव गरजे हे विधान परिषदेचे आमदार बनले आहेत..

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!