Weather Update

Maharashtra Weather Update : राज्यात लवकरच पावसाचे आगमन; ‘या’ जिल्ह्यात दिले येलो अलर्ट

395 0

महाराष्ट्र : राज्यात आज लोकसभा निवडणुकीची मतमोजणी सुरु आहे. या मतमोजणीवर पावसाचे सावट दिसत आहे. आज राज्याच्या अनेक भागात वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा हवामान खात्या कडून देण्यात आले आहे. काही जिल्ह्यांना पावसाचा यलो तर काही जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. राज्यात पुढील पाच दिवस तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. सिंधुदुर्ग वगळता उर्वरित जिल्ह्यात पुढील एक ते दोन दिवस उष्ण व दमट वातावरण राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

‘या’ भागांमध्ये पावसाची शक्यता-

मध्य महाराष्ट्र मराठवाड्यातील बऱ्याच जिल्ह्यांमध्ये पुढील चार ते पाच दिवसांमध्ये मेघगर्जना विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आल्यामुळे तिथे यलो अलर्ट देण्यात आला आहे. धुळे, नंदुरबार जळगाव, नाशिक, औरंगाबाद, बीड, जालना, परभणी हिंगोली, नांदेड या जिल्ह्यात तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.गोवा आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी व विदर्भात आणखी काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. कोकणात पालघर व ठाण्यामध्ये उष्ण व दमट वातावरण राहण्याची शक्यता आहे. रत्नागिरी व सिंधुदुर्ग आजपासून पाच दिवस मेघगर्जना विजांच्या कडकडाटसह पावसाची शक्यता आहे व उर्वरित जिल्ह्यांमध्ये सहा व सात जूनला विजांच्या कडकडासह पावसाची शक्यता आहे. त्यामुळे तिथे यलो अलर्ट देण्यात आलेला आहे.
पुणे व परिसरात आजपासून पुढील चार दिवस आकाश अंशतः दगड राहून दुपारी किंवा संध्याकाळी सामान्यतः ढगाळ तसेच मेघ गर्जना व विजांचा कडकडाटासह पावसाची शक्यता आहे.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!