मुंबई : महाराष्ट्राला अवकाळी पावसाचा (Maharashtra Rain) मोठा फटका बसला आहे, फळ बागा आणि पिकांचं मोठं नुकसान झालं. दरम्यान आता पुन्हा एकदा हवामान विभागाकडून (IMD)महाराष्ट्राला अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. हवामान विभागानं दिलेल्या इशाऱ्यानुसार आज कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
हवामान विभागाकडून पुढील 24 तासांसाठी अहमदनगर, सातारा, पुणे, सोलापूर, जळगाव, चंद्रपूर या जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.हवामान विभागाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार आणखी काही दिवस महाराष्ट्रावर अवकाळीचं संकट कायम राहणार आहे, दिलासादायक बातमी म्हणजे यावर्षी वेळत सात जूनलाच राज्यात मान्सूनचं आगमन होणार आहे.
नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.
Sanjay Raut : संजय राऊतांच्या अडचणीमध्ये वाढ ! ‘त्या’ वक्तव्याप्रकरणी गुन्हा दाखल