अहमदनगर : अहमदनगरमधून (Ahmednagar News) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये एका मुलीने आपल्या प्रियकरासोबत पळून जाण्यासाठी एक धक्कादायक बनाव रचला. तिने वाघाने आपल्याला खाल्ले असल्याचा बनाव रचला. तिने कोंबडीचे रक्त शिंपडून हा सगळा बनाव रचला. मात्र मुलीचा हा बनाव लक्षात येताच तिच्या वडिलांना मोठा धक्का बसला आणि त्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली.
काय आहे नेमके प्रकरण?
ही धक्कादायक घटना अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील हिवरगाव या ठिकाणी घडली आहे. ही घटना ११ मे २०२४ रोजी रात्री घडली आहे. या ठिकाणी एक कुटुंब झोपी गेले होते. यावेळी आई आणि मुलगी बाहेर झोपलेले. आई उठली तर तेथे तिला रक्त दिसले. बिबट्याने मुलीला उचलून नेले असल्याचे तिला वाटले व एकच काहूर केले. ग्रामस्थांना अनेक ठिकाणी शोधूनही ती न सापडल्याने वनविभाग आणि पोलीस प्रशासनास पाचारण करण्यात आले.
यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरु करताच ते रक्त मानवी नसून ते कोंबडीचे असावे तसेच काही कुंकवाचे देखील पाणी असावे असा संशय आला. यानंतर त्याची तपासणी करण्यात आली. तेव्हा रक्ताचा अहवालदेखील तोच आला. यानंतर हा सगळा बनाव असल्याचे उघडकीस आले. यानंतर या प्रकरणाचा अधिक तपास केला असता मुलीने पळून जाण्यासाठी हा बनाव केला असल्याचे समोर आले. शेळ्या मेंढ्या चारण्याच्या संपर्कातून मुलीची ओळख नळवाडी येथील एका मुलाशी झाली व त्यांनी संगनमताने पळून जाण्याचा प्लॅन केला.
ही गोष्ट लक्षात येताच मुलीच्या वडिलांनी रात जाऊन एक दोरी आणत झाडावर जात गळ्याभोवती गळफास घेतला. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली. यावेळी लोकांनी बापाच्या मृत्युला जबाबदार धरून मुलीवर व तिच्या प्रियकरावर गुन्हा दाखल करावा अशी भावना व्यक्त केली.
नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.
Mumbai Hoarding Collapse : घाटकोपरमध्ये कोसळलेल्या ‘त्या’ होर्डिगबाबत ‘ही’ धक्कादायक माहिती आली समोर
Weather Update : पुढील 2 दिवसांत पुण्यात कोसळणार मुसळधार पाऊस; हवामान खात्याने दिला इशारा