Chhatrapati Sambhajinagar Crime

Chhatrapati Sambhajinagar Crime : सख्खा भाऊ पक्का वैरी! शेतीच्या वादातून भावाने काढला भावाचाच काटा

561 0

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरमधून एक धक्कादायक घटना (Chhatrapati Sambhajinagar Crime) समोर आली आहे. यामध्ये शेतीच्या वादातून सख्ख्या भावाची हत्या करण्यात आली आहे. शेती आणि सामाईक घर तसंच जुन्या वादातून भाऊ आणि पुतण्याने विटा, दगडाने मारहाण केली आहे. या घटनेत सख्ख्या भावाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ही घटना सिल्लोड तालुक्यातील भराडी जवळील पिरोळा या ठिकाणी घडली आहे. जम्मन त्रिंबक गोरे, असं खून झालेल्या व्यक्तीचं नाव आहे. तर भाऊ रघुनाथ त्रंबक गोरे आणि पुतण्या कृष्णा रघुनाथ गोरे, अशी आरोपींची नावे आहेत.

काय आहे संपूर्ण प्रकरण?
ही घटना शनिवारी रात्री रोजी घडली आहे. जुन्या शेतीच्या व घराच्या वादातून सख्ख्या भावाचा खून झाला आहे. मृत्त व आरोपी सख्खे भाऊ आहेत. त्यांची वडिलोपार्जित समाईक शेती आणि घर आहे. या संपत्तीवरून त्यांच्यात अनेक दिवसांपासून भांडण सुरू होते. दोन्ही भावांची पिरोळा शिवारात गट नं. 82 मध्ये शेती आहे. जम्मन गोरे भराडी येथे राहत होते, तर आरोपी पिरोळा शिवारातील शेतात राहतात.

मृतक जम्मन गोरे यांचे वखारीचे काम सुरू होते. त्यामुळे शनिवारी रात्री ते शेतात झोपण्यासाठी गेले. झोपल्यावर संधी साधत आरोपींनी त्यांच्या डोक्यावर आणि तोंडावर दगड, विटांनी मारहाण केली. या मारहाणीत मृतक गंभीर जखमी झाले. नंतर आरोपी त्यांना पाण्याच्या डबक्यात टाकून निघून गेले. या घटनेची माहिती मिळताच जम्मन यांच्या मुलांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. तेव्हा त्यांना आपले वडील पाण्याच्या डबक्यात मृत अवस्थेत आढळून आले. यानंतर त्यांनी तातडीने पोलिसांना याची माहिती दिली. यानंतर पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवत आरोपींना अटक केली आहे. सागर जम्मन गोरे यांनी दिलेल्या तक्रारीवरून आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास उपनिरीक्षक सचिन क्षीरसागर करत आहेत.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Ajit Pawar : अजित पवारांना मोठा धक्का ! सख्खे बंधू श्रीनिवास पवार यांनीदेखील सोडली साथ

Kolhapur Accident : कोल्हापुरमध्ये भीषण अपघात! ट्रकने चिरडल्याने 4 जणांचा मृत्यू

Railway Accident : साबरमती -आगरा सुपरफास्ट एक्स्प्रेसचा भीषण अपघात

वीरासन म्हणजे काय; काय असतात फायदे आणि काय काळजी घ्यावी?

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!