पुणे : मनसे नेते वसंत मोरे (Vasant More) यांनी पक्षाचा राजीनामा दिला आहे. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत त्यांनी पक्षाला ‘जय महाराष्ट्र’ करत असल्याचं जाहीर केलं आहे. वसंत मोरे हे पुण्यातील मनसेचं एक मोठं नाव असून, त्यांचा राजीनामा मनसेसाठी मोठा धक्का आहे. दरम्यान आज आपला कडेलोट झाला असून, आपणच यासाठी कारणीभूत असल्याचं वसंत मोरे म्हणाले आहेत. लोकांना आता मी नाटक करतोय का अशी शंका येऊ लागली आहे आणि यासाठी पुणे शहरातील कोअर कमिटी जबाबदार आहे असा आरोप त्यांनी केला आहे.
वसंत मोरेंनी का सोडली मनसे?
“वारंवार एकनिष्ठतेवर संशय घेतला जात असेल, सांगूनही माझ्यावरच कारवाया होत असतील तर मी हतबल आहे. मी लोकसभा निवडणूक लढण्यास इच्छुक असल्याचं बोललो होतो. पण पुण्यात लोकसभा लढण्यासाठी नकारात्मक वातावरण असून आपण लढू शकत नाही असे रिपोर्ट पाठवले जात आहेत. संघटनेला पूरक वातावरण असतानाही डावललं जात असेल आणि जर राज ठाकरेंपर्यंत चुकीचे संदेश जात असतील तर येथे थांबण्यात काही अर्थ नाही. अखेर अपमान किती सहन करायचा. म्हणून आज एकनिष्ठतेचा कडेलोट केला,” असा खुलासा वसंत मोरेंकडून करण्यात आला आहे.
नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.
IPL : IPL 2024 पूर्वी BCCI कडून खेळाडूंची फिटनेस अपडेट जारी
Vasant More : वसंत मोरे यांचा मनसेला जय महाराष्ट्र!
Manohar Lal Khattar : हरियाणामध्ये राजकीय भूकंप ! मनोहरलाल खट्टर यांचा राजीनामा