छत्रपती संभाजीनगर : लोकसभा निवडणूक (Lok Sabha Elections) आता अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपली आहे. यामुळे सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चे बांधणीला सुरुवात केली आहे. निवडणूक आयोगाकडून लवकरच निवडणुकीच्या तारखांची घोषणा होण्याची शक्यता आहे. सर्वच राजकीय पक्षांना निवडणुकीचे वेध लागले आहेत. एमआयएम देखील राज्यात लोकसभेसाठी आपले उमेदवार उभे करणार आहे. याबाबत पक्षाचे खासदार इम्तियाज जलील यांनी मोठी घोषणा केली आहे.
काय म्हणाले इम्तियाज जलील?
एमआयएम राज्यात सहा लोकसभेच्या जागांवर आपले उमेवार उभे करणार आहे. यासंदर्भात इम्तियाज जलील यांनी घोषणा केली आहे. ‘मी जनतेसमोर जाऊन सांगेन, मी काम केले नसेल तर मला मतदान करू नका, असं मोठं वक्तव्य यावेळी जलील यांनी केलं आहे. एमआयएम राज्यात केवळ सहा जागा लढवणार असल्याचा खुलासा देखील त्यांनी यावेळी केला. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आमचंही काही संघटना आणि पक्षांशी बोलणं सुरू आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये हिंदू आणि मुसलमान हाच निवडणुकीचा प्रमुख मुद्दा असेल असंही त्यांनी यावेळी म्हटलं आहे.
नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.
Baramati Loksabha : शिवतारे पराभवाचा वचपा काढणार? विजय शिवतारे यांनी थोपटले दंड
Mumbai Coastal Road : मुंबईतील कोस्टल रोड अखेर खुला!
ST bus Accident : जळगावमध्ये एसटी बसचा भीषण अपघात
Electoral Bonds : इलेक्ट्रोल बॉन्डची माहिती 24 तासांत जाहीर करा; सुप्रीम कोर्टाचे स्टेट बँकेला आदेश
Sharad Pawar : निलेश लंकेंच्या पक्षप्रवेशावर शरद पवारांनी दिले ‘हे’ स्पष्टीकरण
Maratha Reservation : जालन्यात मध्यरात्री पोलीस आणि मराठा आंदोलकांमध्ये जोरदार राडा
Accident News : देवदर्शन घेऊन घरी परतणाऱ्या भाविकांवर काळाचा घाला; 6 जणांचा मृत्यू
Nagpur News : खळबळजनक ! नागपूरमध्ये मांजर चावल्याने 11 वर्षांच्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू
Chandrapur News : धक्कादायक ! 41 पोलीस जवानांना पोलीस कॅन्टीनमधील जेवणातून विषबाधा