मुंबई : भारताचा स्टार खेळाडू अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) मागच्या बऱ्याच काळापासून टीम इंडियातून बाहेर आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये चांगला परफॉर्मन्स दाखवल्यानंतर देखील त्याची साऊथ आफ्रिकेविरुद्धच्या टेस्ट सिरीजमध्ये निवड करण्यात आली नाही. मात्र आता त्याच्याकडे मुंबईच्या टीमचे कर्णधारपद सोपवण्यात आले आहे.
पुढील काहीच महिन्यांत रणजी ट्रॉफी 2024 ला सुरुवात होणार आहे. रणजी ट्रॉफी 2024 मधील सुरुवातीच्या 2 सामन्यांसाठी मुंबईने त्यांच्या 15 सदस्यांच्या टीमची घोषणा करण्यात आली आहे. यावेळी मुंबईच्या टीमचे नेतृत्व अजिंक्य रहाणेकडे सोपवण्यात आले असून तो बिहार आणि आंध्र प्रदेशविरुद्धच्या सामन्यात मुंबईचा कर्णधार असणार आहे. अजिंक्य रहाणेने मागच्या वर्षीदेखील मुंबई संघाच्या कर्णधारपदाची धुरा सांभाळली होती.
मुंबईची टीम 5 जानेवारीपासून बिहारविरुद्ध रणजी ट्रॉफीचा सामना खेळणार आहे तर 12 जानेवारीपासून टीम आंध्र प्रदेश विरुद्ध सामना खेळेल. रणजी ट्रॉफी 2024 च्या पहिल्या दोन सामन्यांमध्ये स्टार खेळाडू पृथ्वी शॉची निवड करण्यात आलेली नाही. पृथ्वी सध्या दुखापत ग्रस्त असल्याने तो सिलेक्शनसाठी उपलब्ध नव्हता.
रणजी ट्रॉफीसाठी मुंबईची टीम
अजिंक्य रहाणे (कर्णधार), जय बिष्टा, भूपेन ललवानी, हार्दिक तैमोर (विकेटकीपर), सरफराज खान, शिवम दुबे, सुवेद पारकर, प्रसाद पवार (विकेटकीपर), शम्स मुलानी, तनुष कोटियान, तुषार देशपांडे, मोहित अवस्थी, धवल कुलकर्णी, रॉयस्टन डायस आणि अथर्व अंकोलेकर
स्टँड बाय प्लेयर्स – अमोघ भटकल, आकाश आनंद, ध्रुमिल मटकर आणि सिलवेस्टर डिसूझा.
नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.
Pandharpur News : मुलाच्या हळदीत नाचताना वडिलांचा दुर्दैवी मृत्यू; मृत्यूचे कारण ऐकून बसेल धक्का
Weather Update : राज्यात पुढील 48 तासांत पावसाची शक्यता; हवामान खात्याने वर्तवला अंदाज
Pune News : पुण्यातील खेड शिवापूर टोल नाक्याजवळ 1 कोटी रुपयांचा मद्यसाठा जप्त
Truck Driver Strike : आंदोलनाचा इंधन पुरवठ्याला मोठा फटका
Sur Nava Dhyas Nava : अकोल्याचा गोपाळ गावंडे ठरला ‘सूर नवा ध्यास नवा’चा विजेता