अहमदनगर : अहमदनगर (Ahmadnagar News) जिल्ह्यातील निर्मळपिंप्री गावात ग्रामपंचायत निवडणुकीच्या वादातून जमावाने दोन कुटुंबावर जीवघेणा हल्ला केला आहे. पोलीस आणि नागरिकांच्या हस्तक्षेपामुळे या कुटूंबाचा जीव वाचला आहे. राहाता तालुक्यातील निर्मळ पिंप्री गावामध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. ग्रामपंचायत निवडणुकीत झालेल्या पराभवाच्या रागातून दोन कुटुंबावर चारशे ते पाचशे लोकांच्या जमावाने जीवघेणा हल्ला केला आहे.
दोन दिवसांपूर्वी एका हॉटेलवरही मारहाण झाली होती, पण ते प्रकरण सामोपचाराने मिटवण्यात आलं होतं, मात्र एका ग्रामपंचायत सदस्याला अर्वाच्च शिवीगाळ केल्याची ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर वाद पुन्हा उफाळून आला. यानंतर जमावाने दोन कुटुंबावर जीवघेणा हल्ला केला. सुदैवाने काही पोलीस घटनास्थळी होते त्यांनी रक्षण केल्याने कुटुंबियांचा जीव वाचला आहे.
संतप्त झालेल्या 400 ते 500 लोकांच्या जमावाने घराची तोडफोड आणि जाळपोळ केली आहे. लोणी पोलीस ठाण्यात 71 जणांविरोधात अॅट्रोसीटीसह मारहाण केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींचा शोध सुरू आहे. या प्रकारामुळे गावात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.
Teeth Whitening : ब्रश करुनही दाताचा पिवळेपणा जात नसेल तर दिवसातून 2 वेळा ‘या’ पदार्थाने करा साफ
Animal Movie : ‘अॅनिमल’ OTT वर कुठे आणि कधी होणार रिलीज? समोर आली ‘ही’ तारीख
Keral Suicide : ‘ती’ मागणी पूर्ण करता न आल्याने डॉक्टर तरुणीने उचलले ‘हे’ पाऊल
Vasai Crime News : खळबळजनक ! ‘त्या’ एका शुल्लक कारणावरून विद्यार्थ्याकडून 8 वर्षीय चिमुकलीची हत्या
Rupali Chakankar : राष्ट्रवादी कुणाची; रूपाली चाकणकरांनी दिलं ‘हे’ उत्तर
TV Actor Bhupinder Singh : खळबळजनक ! ‘या’ अभिनेत्याचा दिवसाढवळ्या एका कुटुंबावर गोळीबार; 1 जण ठार
Mumbai-Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर एसटी बसचा भीषण अपघात
Lalit Patil Case : मोठी कारवाई ! ललित पाटील प्रकरणात ‘हे’ दोन पोलीस अधिकारी बडतर्फ
Disha Salian Case : दिशा सालियान प्रकरणात आदित्य ठाकरेंची होणार चौकशी; फडणवीसांनी दिले आदेश
Travels on Fire : हज यात्रेला निघालेल्या ट्रॅव्हल्सला तासवडे टोलनाक्याजवळ लागली भीषण आग