Sanjay Raut

Sanjay Raut : 4 राज्यांच्या निकालावर संजय राऊतांनी दिली ‘ही’ प्रतिक्रिया

528 0

मुंबई : आज 4 राज्यांच्या विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू आहे. आतापर्यंत हाती आलेल्या कलानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सध्याच्या निकालानुसार भाजपने मध्यप्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड या राज्यात आघाडी घेतली आहे तर तेलंगणामध्ये काँग्रेसने एकहाती सत्ता मिळण्याच्या दिशेने वाटचाल सुरु केली आहे.

काय म्हणाले संजय राऊत?
तेलंगणाचे मुख्यमंत्रीही पिछाडीवर आहेत. मला नाही वाटत की ते निवडणूक हरतील. एक दोन तासात चित्र स्पष्ट होईल.मतदानाची पाचवी सहावी फेरी सुरूय. 25 पर्यंत राउंड असतात. त्यामुळे निकालाचं चित्र स्पष्ट होण्यासाठी थोडी वाट बघा असंही राऊत म्हणाले.तसेच राजस्थान आणि मध्य प्रदेशात चुरस होईल. राजस्थानमध्ये भाजपला यश मिळालं तर वसुंधरा राजेंना श्रेय आणि मध्य प्रदेशात यश मिळाले तर शिवराज सिंह चौहान यांना श्रेय. मोदीजी आणि शहांना नाही असं राऊतांनी म्हटलं.

ते पुढे म्हणाले की, मिझोराममध्ये भाजप नाही. तेलंगनात सध्या चौथ्या क्रमांकावर आहे. तिथं काँग्रेस पुढे आहे. छत्तीसगढमध्ये काँग्रेसचं सरकार आहे. मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये भाजप-काँग्रेसमध्ये जोरदार लढाई आहे. या राज्यात भाजपने यश मिळवल्यास मोदी-शहांचे यश नसेल. तिथं मामाजी आणि महाराणी यांच्यामुळेच यश मिळू शकेल असं म्हणता येईल.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

मध्यप्रदेश, राजस्थानात काँटे की टक्कर; कल हाती यायला सुरुवात

Prerna Tuljapurkar : प्रेरणा पुष्कर तुळजापूरकर यांची भाजपच्या पुणे शहर महिला आघाडीच्या प्रसिद्धी प्रमुख पदी नियुक्ती

Telangana Election Result : महाराष्ट्र जिंकायला निघालेल्या ‘राव’ यांच्यावर तेलंगणा गमावण्याची वेळ?

Mumbai Fire News : मुंबईत गिरगावमध्ये भीषण आग; 2 जणांचा मृत्यू

Maharashtra Politics : निवडणुकीचा निकाल 4 राज्यांचा ! धक्का मात्र ठाकरे गटाला

Maharashtra Weather : ‘मिचाँग’ चक्रीवादळाचा महाराष्ट्राला फटका; ‘या’ जिल्ह्यांना दिला ऑरेंज अलर्ट

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!