मुंबई : सध्या राज्यात मराठा आरक्षणावरुन मनोज जरांगे पाटील आणि राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांच्यात चांगलीच जुंपली आहे. मराठा समाजास ओबीसीतून आरक्षण देण्यास छगन भुजबळांनी विरोध दर्शवला. याचबरोबर मराठा समाज मागासच नाही असं सांगत शिंदे समिती बरखास्त करा, अशी मोठी मागणी छगन भुजबळ यांनी केली आहे. यावर आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार सु्प्रिया सुळे (Supriya Sule)यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?
“भुजबळ साहेब हे वयाने आणि कर्तृत्त्वाने मोठे आहेत. मला काही बोलायचे आहे. मात्र, त्यामुळे कोणताही गैरसमज करुन घेऊ नयेत. छगन भुजबळ यांनी त्यांची मागणी सरकारकडे मांडावी. ज्या मागण्या व्यासपीठावर केल्या जात आहे, त्या बंद दरवाजामागे किंवा कॅबिनेटच्या बैठकीत मांडल्या तर बरे होईल.” तसेच “राज्यात गलिच्छ राजकारण सुरु आहे, ज्याला खोके सरकार जबाबदार आहे. या सरकारमध्ये भुजबळांना महत्त्वाचे पद मिळाले आहे. सरकारमध्ये २०० आमदार असताना त्यांच्या मंत्र्याला बोलायला बाहेरचे व्यासपीठ लागत आहे. सरकारमध्ये मिसमॅनेजमेंट दिसते आहे”,अशा शब्दात सुप्रिया सुळेंनी सरकारवर निशाणा साधला आहे.
नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.
Hingoli News : राजू शेतात जाऊन येतो; म्हणत घरातून गेला मात्र माघारी परतलाच नाही
Kantara 2 First Look : ऋषभ शेट्टींच्या ‘कांतारा 2’चा फर्स्ट लूक व्हायरल
Accident News : कन्नड घाटात कारचा भीषण अपघात; 4 जणांचा मृत्यू
Filmfare OTT Awards 2023 : ‘फिल्मफेअर ओटीटी अवॉर्ड्स 2023’ जाहीर