Hingoli News

Hingoli News : राजू शेतात जाऊन येतो; म्हणत घरातून गेला मात्र माघारी परतलाच नाही

601 0

हिंगोली : हिंगोलीमधून (Hingoli News) एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. औंढा नागनाथ तालुक्यातील गोजेगाव या ठिकाणी शेतात थांबल्याने युवकावर वीज कोसळून त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. राजू शंकर जायभाय (26) असे मृत तरुणाचे नाव आहे. राजूच्या वडिलांचे दीड वर्षापूर्वी निधन झाले होते. त्यामुळे त्यांच्या निधनानंतर राजूच्या खांद्यावर लहान भाऊ अपंग असल्याने घराची संपूर्ण जबाबदारी आली होती.

नेमके काय घडले राजूसोबत?
ढगाळ वातावरण निर्माण झाल्याने पाऊस येणार असल्याचे बघून मध्यरात्री गोजेगाव, चीमेगाव शिवारात शेतात वेचणी केलेला कापूस झाकण्यासाठी राजू जायभाय, विष्णू सिताराम नागरे आणि नवनाथ गीते हे तिघे जण रात्री शेतात जागल करत असताना ३ वाजेच्या सुमारास अंगावर वीज पडून राजू जायभाय याचा मृत्यू झाला तर बाकी दोघेजण जखमी झाले. राजूचा असा दुर्दैवी मृत्यू झाल्याने त्याच्या कुटुंबावर मोठा दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

मात्र या घटनेमुळे संपूर्ण कुटुंबच हादरलं आहे. मी शेतात जाऊन लगेच येतो म्हणणार लेकरू आता परत कधीच येणार नाही. यामुळे कुटुंब धाय मोकलून रडत आहे. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे. या प्रकरणी पोलीस स्टेशनमध्ये आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

National Constitution Day : 26 नोव्हेंबरलाच का साजरा करतात संविधान दिवस?

Delhi Crime : देश हादरला ! 350 रुपयांसाठी तरुणाची 60 वेळा चाकू भोसकून हत्या

Shivsena : ‘सगळी तयारी झालीये, 31 डिसेंबरला…’, शिवसेना शिंदे गटाच्या नेत्याचे मोठे विधान

Asia Cup 2023 : आशिया कपसाठी टीम इंडियाची घोषणा

Zero Balance Account : खात्यात पैसे नाहीत? नो टेन्शन आता झिरो बॅलन्स असतानाही बँक देणार पैसे

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!