नाशिक : राज्यात अपघाताचे प्रमाण वाढतच चालले आहे. मनमाड-येवला राज्यमार्गावर (Nashik News) भीषण अपघात झाला आहे. कंटेनर आणि स्विफ्ट कारची समोरा – समोर धडक झाल्याने हा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात पाच जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. या अपघातामुळे महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. अंकाई रेल्वे उड्डाण पुलावर हा भीषण अपघात झाला.
भरधाव वेगात असलेल्या स्वीफ्ट कारने कंटनेनरला धडक दिल्याने हा अपघात झाल्याचे प्राथमिकदृष्ट्या समोर आले आहे. ही धडक इतकी भीषण होती या अपघतात स्वीफ्ट कारचा पूर्णपणे चुराडा झाला आहे. या अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेऊन अपघात ग्रस्तांना कार मधून बाहेर काढले. मात्र त्या सर्वांचा जागीच मृत्यू झाला होता.
यावरून हा अपघात किती गंभीर होता याचा तुम्ही अंदाज लावू शकता. अपघातातील सर्व जण नाशिक येथील रहिवाशी होते. या अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आहे. पोलीस मृत तरुणांच्या नातेवाईकांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत आहेत.
नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.
National Constitution Day : 26 नोव्हेंबरलाच का साजरा करतात संविधान दिवस?
Delhi Crime : देश हादरला ! 350 रुपयांसाठी तरुणाची 60 वेळा चाकू भोसकून हत्या
Shivsena : ‘सगळी तयारी झालीये, 31 डिसेंबरला…’, शिवसेना शिंदे गटाच्या नेत्याचे मोठे विधान
Asia Cup 2023 : आशिया कपसाठी टीम इंडियाची घोषणा
Zero Balance Account : खात्यात पैसे नाहीत? नो टेन्शन आता झिरो बॅलन्स असतानाही बँक देणार पैसे