मुंबई : हिंदी मनोरंजनसृष्टीतून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. लोकप्रिय सिने-दिग्दर्शक आणि निर्माते राजकुमार कोहली (Rajkumar Kohli) यांचे निधन झाले आहे. वयाच्या 95 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. राजकुमार यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. आज संध्याकाळी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.
राजकुमार कोहली यांनी सिनेमाचे केले दिग्दर्शन
राजकुमार कोहली यांनी अनेक गाजलेल्या सिनेमांच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. नागिन, जानी दुश्मन, बीवी नौकर का, बदले की आग, राज तिलक, जीने, नहीं दूंगा, इंतकाम, बीस साल बाद सारख्या अनेक सिनेमाचं दिग्दर्शन त्यांनी केलं आहे. ‘नागिन’ आणि ‘जानी दुश्मन’ हे त्यांचे सिनेमे सुपरहिट ठरले होते. ‘जानी दुश्मन’ हा मल्टीस्टार सिनेमा ठरला होता. या सिनेमात अक्षय कुमार, सनी देओल, सुनील शेट्टी, सोनू निगम, अरमान कोहली मुख्य भूमिकेत होते. 2002 मध्ये हा सिनेमा रिलीज झाला होता.
राजकुमार कोहली यांचा जन्म 1930 रोजी झाला. 1960 रोजी त्यांनी आपल्या सिनेक्षेत्रातील करिअरची सुरुवात केली. 1963 मध्ये ‘सपनी’ या सिनेमाच्या माध्यमातून त्यांनी मनोरंजनसृष्टीत पदार्पण केलं. पण ‘नागिन’ या सिनेमाच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने त्यांना लोकप्रियता मिळाला. त्यानंतर त्यांचा ‘जानी दुश्मन’ हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला. हा भारतातील पहिला हॉरर सिनेमा होता. राजकुमार कोहली यांच्या निधनाने हिंदी मनोरंजनसृष्टीला मोठा धक्का बसला आहे.
नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.
Hingoli News : हिंगोली हळहळलं ! नवरा-बायकोचा वाद चिमुकल्यांच्या जीवावर बेतला
Shrirampur News : एजंटकडून सही दिली नाही म्हणून RTO कर्मचाऱ्यावर जीवघेणा हल्ला
Mumbai Airport : खळबळजनक ! मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ बॉम्बने उडवण्याची धमकी