Team

IND vs AUS Final: इतिहासाची होणार पुनरावृत्ती ! ज्या ज्या वेळी भारताने फायनलला टॉस हरला, त्यावेळी भारताने वर्ल्डकप जिंकला

916 0

विश्वचषक 2023 च्या अंतिम सामन्याला (IND vs AUS Final) काही वेळात सुरुवात होणार आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात हा सामना खेळवण्यात येणार आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर हा महामुकाबला पार पडणार आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने या स्पर्धेत आतापर्यंत अप्रतिम कामगिरी केली आहे.या सामन्यात ऑस्ट्रेलियाने टॉस जिंकून बॉलिंग करण्याचा निर्णय घेतलाय. टीम इंडिया पहिली बॅटिग करणार आहे. नाणेफेक झाल्यानंतर एक अजब योगायोग समोर आला. फायनलमध्ये भारताने जेव्हा जेव्हा नाणेफेक गमावली, तेव्हा तेव्हा भारताने विश्वचषक उंचावलाय. 1983 आणि 2011 च्या विश्वचषक फायनलमध्ये टीम इंडियाने नाणेफेक गमावली होती. पण टीम इंडियाने विश्वचषक उंचावला होता. आजही रोहित शर्माने नाणेफेक गमावली, त्यानंतर भारतीय संघाच्या चषक विजयाची शक्यता आणखी वाढली आहे. चला या काय आहेत ते योग जाणून घेवुयात…

1983 – भारतीय संघाचा कर्णधार कपिल देव यांनी विश्वचषकाच्या फायनलमध्ये नाणेफेक गमावली होती. भारताने प्रथम फलंदाजी करताना फलंदाजी करताना 183 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरदाखल वेस्ट इंडिजचा संघ 140 धावांत ऑलआऊट झाला होता. मोहिंदर अमरनाथ यांना सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले होते.

2011 – विश्वचषकात एमएस धोनीने नाणेफेक गमावली होती. कुमार संगाकाराने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेताल होता. जयवर्दनेच्या शतकाच्या बळावर लंकेने 277 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरदाखल भारताने हे आव्हान सहा विकेटच्या मोबदल्यात पार पाडले. एमएस धोनी आणि गौतम गंभीर यांनी शानदार खेळी केली होती. धोनीला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले होते.

2023 Final – ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्स याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांच्याकडून आक्रमक सुरुवात मिळाली आहे. आजच्या सामन्यातही नाणेफेक गमावणारा संघ चषक उंचावणार का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!