ग्रामपंचायत रणधुमाळी: राज्यभरातील तब्बल ‘इतक्या’ ग्रामपंचायतींसाठी आज मतदान

1360 0

राज्यभरातल्या 2 हजार 369 ग्रामपंचायतींसाठी आज मतदान होणार आहे. अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

राज्यातील 2 हजार 369 ग्रामपंचायतीची निवडणूक अत्यंत महत्त्वाची आहे. कारण, थेट जनतेमधून सरपंच निवडण्यात येणार आहे. त्यामुळे निवडणुकीसाठी गावागावात चुरस आहे. गावगाड्याचा कारभार ठरविला जात असताना काही बड्या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

बारामती तालुक्यातील काटेवाडीत अजित पवार गट विरोधात भाजपा पुरस्कृत पॅनेल अशी लढत आहे. राष्ट्रवादीत बंडखोरी करून उपमुख्यमंत्री झालेले अजित पवार हे काटेवाडीत बाजी मारणार की भाजपाचा उमेदवार, याकडे राज्याचं लक्ष लागलेलं आहे.

Share This News
error: Content is protected !!