सातारा जिल्ह्यातील कृष्णा प्रकल्पाच्या फेरजलनियोजनास राज्य शासनाची मान्यता

506 0

मुंबई, दि. १: बोंडारवाडी प्रकल्पासह सातारा जिल्ह्यातील कृष्णा प्रकल्पाच्या फेरजलनियोजनास राज्य शासनाने मान्यता दिली आहे. त्यासंदर्भात ३० सप्टेंबर रोजी सुधारित शासन निर्णय देखील जाहिर करण्यात आला आहे.

आमदार अनिल बाबर यांनी याविषयी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पाठपुरावा केला होता.

दरम्यान, रविवारी रात्री आमदार श्री. बाबर यांनी ‘वर्षा’ निवासस्थानी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली, त्यावेळी शासन निर्णयाची प्रत मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी आमदार बाबर यांना दिली. दरम्यान, टेंभू योजनेच्या तिसऱ्या सुधारित प्रशासकीय मान्यतेचा प्रस्ताव मंत्रिमंडळाच्या बैठकीत मांडण्यात येईल, असेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आमदार बाबर यांना सांगितले.

दुष्काळी खानापूर आटपाडी व विसापूर सर्कल तासगाव तालुक्यातील ३४ गावातील शेतकऱ्यांना टेंभू योजनेचे हक्काचे पाणी मिळावे, यासाठी आमदार बाबर पाठपुरावा करीत करीत आहेत. टेंभू विस्तारीत योजनेसाठी आठ टी. एम. सी.पाणी उपलब्ध करुन देण्यास राज्य शासनाने मंजूरी दिली आहे.

Share This News
error: Content is protected !!