Salt

Salt : महिनाभर मीठ खाणं बंद केलं तर…; तर तुम्हाला जाणवू शकतो ‘हा’ त्रास

557 0

आपल्या जीवनात मिठाला (Salt) अनन्यसाधारण महत्व आहे. आपल्या जेवणाच्या प्रत्येक पदार्थामध्ये मीठ असल्याशिवाय आपण ते खात नाही. इतकंच नव्हे तर काही पदार्थ मीठाशिवाय बेचव लागतात. मिठाचे (Salt) सेवन मर्यादित प्रमाणात केल्यास त्याचा आरोग्याला फायदा होतो. मात्र याच मिठाचा अतिवापर तुम्हाला तुम्हाला आजारी पाडू शकतो. जास्त मीठ खाल्ल्याने उच्च रक्तदाब, हृदयविकार आणि पक्षाघात या आजरांचा धोका उद्भवू शकतो. तसेच मिठाच्या अतिसेवनामुळे किडनीच्या कार्यावर देखील मोठा परिणाम होतो.

जास्त मीठ खाल्ल्याने किडनी स्टोन आणि किडनी निकामी होण्याची शक्यता असते. त्यामुळे तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, मीठाचं सेवन योग्य प्रमाणात करणं गरजेचं आहे. अशातच काही लोकं डाएटचा भाग म्हणून मीठाचं प्रमाण कमी करतात किंवा पूर्णतः बंद करतात. दररोज तुम्ही मीठाचं सेवन करत असाल आणि ते अचानक बंद केलं तर त्याचा काय परिणाम होतो हे आज आपण जाणून घेणार आहोत…

तब्बल एक महिना मीठ खाल्लं नाही तर…
1) सुरुवातीच्या काळात शरीरात सोडियमचं सेवन कमी झाल्याने बॉटर रिटेंशनमध्ये कमतरता जाणवते. यावेळी तुमच्या ब्लड प्रेशरचा स्तरही खालावू शकतो.
2) शरीरात मीठाचं प्रमाण कमी झालं की, इलेक्ट्रोलाईटचं असंतुलन होऊ शकतो. ज्यामुळे स्नायूंच्या कार्यामध्ये अडथळा, मज्जातंतूंचे संक्रमण, मळमळ होण्याची शक्यता असते
3) याशिवाय मीठाचं सेवन बंद केल्यानंतर तुम्हाला उल्टी होणं, चक्कर येण्याची समस्या जाणवू शकते.
4) शरीरात मिठाच्या कमतरतेमुळे व्यक्ती कोमात देखील जाऊ शकते.

एका सामान्य व्यक्तीला दररोज 5 ग्रॅम म्हणजेच 1 चमचे मीठ (Salt) आवश्यक असतं. जर व्यक्तीला किडनी, लिव्हर किंवा डायलेटेड कार्डिओमायोपॅथी सारख्या समस्या नसतील तर आहारात मीठाचे सेवन कमी करू नये असे तज्ज्ञांकडून सांगण्यात आले आहे.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!