स्वातंत्र्याच्या 70 वर्षात प्रस्थापितांनी धनगर समाजाची कोंडी केली – गोपीचंद पडळकर

264 0

मुंबई – 70 वर्षे सत्तेत असलेल्या प्रस्तापितांनी राजकारणासाठी धनगर समाजाची कोंडी केली असून सध्याचं सरकार 3 कोटी धनगर समाजाच्या तोंडाला बोळा काम करतंय असं म्हणून त्यांनी महाविकास आघाडी सरकारवरती टीका केली आहे.

पडळकर म्हणाले, “मागच्या पाच वर्षात ज्यावेळी भाजपाचं सरकार सत्तेतं होतं. त्यावेळी त्यांनी धनगर समाजाचे हिताचे अनेक निर्णय घेतले. त्यांनी सुरू जनहिताच्या अनेक योजना सध्याचं सरकार बंद करीत आहे”

“स्वातंत्र्याच्या ७० वर्षात प्रस्थापितांनी धनगर समाजाची कोंडी केली होती. जोपर्यंत धनगर समाजाला ‘एसटी’चा दाखला मिळत नाही. तोपर्यंत ती कोंडी फोडण्याची ताकद फडणवीस सरकारनं धनगर समाजासाठी दिलेल्या “जे आदिवासांनी ते धनगरांना” या धोरणांतर्गत महाराजा यशवंतराव होळकर महामेष योजनेसह २२ कल्याणकारी योजनेत होती. यासाठी १ हजार कोटींच्या निधीची तरतूद करण्यात आली होती. मात्र प्रस्थापितांनी सत्ता ताब्यात घेऊन परत ३ कोटी धनगर समाजाच्या तोंडावर बोळा फिरवण्याचं काम केलंय” असे पडळकर म्हणाले.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!