बागेश्ववर बाबानं पुन्हा उधळली मुक्ताफळं; म्हणाले साईबाबा….

546 0

नेहमी काही ना काही वक्तव्ये करून चर्चेत राहणारे बागेश्वर धामचे महंत पंडित धीरेंद्र शास्त्री यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केले आहे.

“संताची पूजा करायची तर हिंदूंमध्ये संत कमी आहेत का? तुलसीदास, सूरदास किंवा इतर कोणतेही संत असोत ते केवळ महापुरुष आहेत, युगपुरूष आहेत, परंतु ते ईश्वर नाहीत. त्याचप्रमाणे साईबाबा हे संत असू शकतात, फकिर असू शकतात. मात्र, ईश्वर नाही,” असे ते म्हणाले.

यापूर्वी बागेश्वर बाबांनी संत तुकाराम महाराज यांच्याविषयीही वादग्रस्त विधान केलं होते. त्यावेळीही त्यांच्यावर टीका झाली होती. त्यानंतर त्यांनी आपले विधान मागे घेतलं होते. त्यांनी माफी मागितली होती.

Share This News
error: Content is protected !!