मुंबई: राज्यात झालेल्या सत्तांतरानंतर एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतल्यानंतर तब्बल 39 दिवसानंतर अठरा मंत्र्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली मात्र या मंत्रांचा खातेवाटप जाहीर न झाल्याने विरोधकांकडून टीकेची झोड उठवण्यात येत होती.
त्यानुसार मुख्यमंत्र्यांकडे सामान्य प्रशासन, नगर विकास, माहिती व तंत्रज्ञान, माहिती व जनसंपर्क, सार्वजनिक बांधकाम(सार्वजनिक प्रकल्प), परिवहन, पणन, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य, मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन, मृद व जलसंधारण, पर्यावरण व वातावरणीय बदल, अल्पसंख्याक व औकाफ तसेच इतर कोणत्याही मंत्र्यांना वाटप न केलेले विभाग आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृह, वित्त व नियोजन, विधी व न्याय, जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, गृहनिर्माण, ऊर्जा, राजशिष्टाचार ही खाती असतील.
इतर 18 मंत्र्यांची खाती
- राधाकृष्ण विखे-पाटील – महसूल, पशुसंवर्धन आणि दुग्धविकास
- सुधीर मुनगंटीवार-वने, सांस्कृतिक कार्य, व मत्स्य व्यवसाय
- चंद्रकांत पाटील- उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्य
- डॉ. विजयकुमार गावित-आदिवासी विकास
- गिरीष महाजन- ग्राम विकास आणि पंचायती राज, वैद्यकीय शिक्षण, क्रीडा व युवक कल्याण
- गुलाबराव पाटील- पाणीपुरवठा व स्वच्छता
- दादा भुसे-बंदरे व खनिकर्म
- संजय राठोड-अन्न व औषध प्रशासन
- सुरेश खाडे- कामगार
- संदीपान भुमरे-
- रोजगार हमी योजना व फलोत्पादन
- उदय सामंत- उद्योग
- प्रा.तानाजी सावंत-
- सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण
- रवींद्र चव्हाण –
- सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून), अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण
- अब्दुल सत्तार-
- कृषी
- दीपक केसरकर-
- शालेय शिक्षण व मराठी भाषा
- अतुल सावे-
- सहकार, इतर मागास व बहुजन कल्याण
- शंभूराज देसाई-
- राज्य उत्पादन शुल्क
- मंगलप्रभात लोढा-
- पर्यटन, कौशल्य विकास व उद्योजकता, महिला व बालविकास