इंग्रजांच्या गुलामीत खितपत भारतास ‘प्रजासत्ताक’ बनवण्यात यशस्वी नेतृत्व दिल्यानेच महात्मा गांधी जननायक-  गोपाळ तिवारी

321 0

पुणे:गुलामीच्या पारतंत्र्यातील खितपत देशास ‘भारतीय प्रजासत्ताक’ अर्थात प्रजेची लोकशाहीरुपी-सत्ता बनवण्याचे महत् कार्य गांधींनी ‘सत्य व अहिंसेच्या’ तत्वांवर केल्यामुळे स्वातंत्र्यलढ्याचे ते जननायक झाले व महात्मा ठरले अशी भावना काँग्रेस राज्य प्रवक्ते व गांधी जाणुयात’ पुणे चे सदस्य गोपाळ तिवारी यांनी knowing Gandhi, Pune (गांधी जाणूयात, पुणे) ग्रुपतर्फे आयोजित स्नेह संमेलनात केले.

यावेळी बोलताना तिवारी म्हणाले, महात्मा गांधींचे मार्गदर्नाखाली पं नेहरू, सरदार पटेल, डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी लोकशाही रूपी ‘प्रजेची-सत्ता’ स्थापित करून, प्रजेस ‘स्वतंत्र भारताचे नागरीक’ बनवून देशाचे सत्ताधारी ठरवण्याचा अधिकार संविधानद्वारे दिला व स्वातंत्र्य लढ्यात जीवांचे बलीदान देणाऱ्या शहीदांचे लोकशाहीरूपी स्वतंत्र भारताचे स्वप्न ऊदयास आले याचे ऊचीत स्मरण स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवात करणे व त्यांचे प्रती कृतज्ञता व्यक्त करणे हे भारतीयांचे कर्तव्य ठरते.

‘गांधी जाणूयात, पुणे’चे स्नेह संमेलन शनिवारी हॅाटेल सेंट्रल पार्क, शिवाजी नगर येथे संपन्न झाले. यावेळी ते बोलत होते.
या वेळी प्रा. अक्षय कदम, रमाकांत पाठक, संकेत मुनोत, बी.आर. माडगूळकर, सुर्यकांत मारणे, समीर गांधी, अतुल आपटे, भोला वांजळे, ऍड. अश्विनी गवारे, सुशील झोरापूरकर, दिगदर्शीका स्वप्ना पाटसकर, एकनाथ पाठक, जेष्ठ पत्रकार व समिती सदस्य दिपक जाधव इ. उपस्थित होते.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!