नगरपरिषदा व नगर पंचायतीतील अध्‍यक्ष जनतेतून थेट निवडणूकीद्वारे निवडा; सुधीर मुनगंटीवार यांची मागणी

223 0

मुंबई: राज्‍यातील नगरपरिषदा व नगर पंचायतीतील अध्‍यक्ष जनतेतून थेट निवडणूकीद्वारे निवडावे तसेच ग्राम पंचायतींचे सरपंच सुध्‍दा जनतेतुन थेट निवडणूकीद्वारे निवडावे अशी मागणी माजी अर्थमंत्री आणि भाजपा आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी उपमुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्‍याकडे केली. या दोन्‍ही मागण्‍या लोकहित जपणा-या असून त्‍या माध्‍यमातुन नगरविकास व ग्रामविकासाला योग्‍य चालना मिळेल असे सांगत लवकरच याबाबत योग्‍य निर्णय घेण्‍याचे आश्‍वासन उपमुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं असल्याचं मुनगंटीवार यांनी सांगितलं 

 

महाराष्‍ट्र नगरपरिषद, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, 1965 यातील विद्यमान तरतूदींनुसार नगरपरिषदेतील व नगरपंचायतीतील निवडून आलेल्‍या परिषद सदस्‍यांमधून अध्‍यक्ष निवडला जात आहे. नगरपरिषद व नगरपंचायत च्‍या कामकाजामध्‍ये स्‍थैर्य प्राप्‍त होण्‍याकरिता लोकांमधून नगरपरिषद व नगरपंचायतीच्‍या अध्‍यक्ष पदाकरिता थेट निवडणूक घेणारी यंत्रणा पुन्‍हा अंगीकारणे आवश्‍यक आहे. नगरपरिषद व नगरपंचायतच्‍या परिणामकारक कामकाजासाठी आणि विकासासाठी अध्‍यक्षाचे पद सक्षम करण्‍याकरिता व निवडून आलेला अध्‍यक्ष हा आपल्‍या नगरातील लोकांना थेट जबाबदार असण्‍याकरिता अध्‍यक्ष थेट जनतेतुन निवडून येणे आवश्‍यक असल्याचं मत सुधीर मुनगंटीवार यांनी यावेळी व्यक्त केलं

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!