विधान परिषदेच्या दहा जागांसाठी आज मतदान होत असून या निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.
भाजपा कडून आमचे पाचही उमेदवार विजयी होतील असा दावा केला जात असतानाच महाविकासआघाडीकडून देखील आमचे सहाही उमेदवार विजयी होती असा विश्वास केला केला आहे.
दरम्यान या पार्श्वभूमीवर आमचं एकही मत बाद नाही महाविकास आघाडीचे सहाही उमेदवार विजयी होणार असल्याचा विश्वास राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे यांनी व्यक्त केला आहे. मतदानानंतर भरणे यांनी माध्यमांशी संवाद साधला