नुकताच महाराष्ट्र स्टेट बोर्डाचा दहावी आणि बारावीचा निकाल जाहीर करण्यात आला आहे.
ज्या विद्यार्थ्यांना या दहावी आणि बारावीच्या परीक्षेत अपयश आलं त्यांच्यासाठी पुरवणी परीक्षांच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. या पुरवणी परीक्षा ही जुलै आणि ऑगस्टमध्येच घेतली जाणार आहे.
पुरवणी परीक्षांच्या माध्यमातून श्रेणी/ गुणसुधार योजनेअंतर्गत आपली संपादणूक सुधारू इच्छिणाऱ्या किंवा उत्तीर्ण होऊ पाहणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांनी नव्या उमेदीने आणि मेहनतीने अभ्यास करावा आणि या संधीचे सोने करावे.#HSC #SSC #supplementary#exams
— Prof. Varsha Eknath Gaikwad (@VarshaEGaikwad) June 19, 2022
शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी ट्विटरच्या माध्यमातून ही माहिती दिली असून त्या आपल्या ट्विटमध्ये म्हणतात पुरवणी परीक्षांच्या माध्यमातून श्रेणी/ गुणसुधार योजनेअंतर्गत आपली संपादणूक सुधारू इच्छिणाऱ्या किंवा उत्तीर्ण होऊ पाहणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांनी नव्या उमेदीने आणि मेहनतीने अभ्यास करावा आणि या संधीचे सोने करावं असं म्हणाल्या.
तसेच इ.१२ वीच्या प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी आणि अंतर्गत मूल्यमापन परीक्षा २० जुलै ते ८ ऑगस्ट आणि इ. १० वीच्या परीक्षा २६ जुलै ते ८ ऑगस्ट या दरम्यान होणार आहेत. सविस्तर वेळापत्रकासाठी https://t.co/KX9sqYrmnj वर संपर्क साधावा.
— Prof. Varsha Eknath Gaikwad (@VarshaEGaikwad) June 19, 2022
या परीक्षांसाठी इ.१० वीच्या इच्छुक विद्यार्थ्यांचे अर्ज भरण्याची प्रक्रिया दिनांक २० जून पासून सुरू होईल, तर इ.१२ वीच्या विद्यार्थ्यांचे अर्ज भरण्याची प्रक्रिया १० जूनपासून सुरू आहे. All the best!
— Prof. Varsha Eknath Gaikwad (@VarshaEGaikwad) June 19, 2022