आता मिथेनॉल निर्मिती करा; केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं आवाहन

366 0

जगातील अनेक देशांत मिथेनॉलवर ट्रक चालतात तर भारतात देखील आता आसाममध्ये कोळशापासून मिथेनॉल निर्मिती सुरू झाली असून मिथेनॉलचा दर २४ रुपये प्रति लिटर आहे. त्यामुळं ते सर्वांना परवडणारं आहे.

त्यामुळे राज्यात मिथेनॉलवर आधारित अर्थव्यवस्था सुरू करावी, असे आवाहन केंद्रीय रस्ते वाहतूक व परिवहनमंत्री नितीन गडकरी यांनी केले.

वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये आयोजित दोन दिवसीय साखर परिषदेत ते बोलत होते. ते म्हणाले, राज्यात आरसीएफ, व दीपक फर्टीलायझर्स या कंपन्या मिथेनॉल तयार करतात. त्यामुळे येणाऱ्या काळात विदर्भातील कच्च्या कोळशापासून मिथेनॉल करता येईल. आत्मनिर्भर भारताचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी कृषी आणि ग्रामीण क्षेत्रात क्रांतीची गरज आहे.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!